Monday 10 September 2018

थेंबे थेंबे तळे साचे



कुठल्याही मोठ्या कामामध्ये त्यात सहभागी असलेल्या शेवटच्या माणसाला आपली जबाबदारी पूर्ण करायची संधी मिळाली तर मोठ मोठाली कामेही सुरळीत पार पडतात . मिळालेलया यशामध्ये माझाही खारीचा वाटा आहे,  यामुळे एक अभिमानाची भावना निर्माण होते त्याचे मोल पैशामध्ये करता येणे अशक्य आहे.
आणि याच भावने मुळे भविष्यातही मिळवलेले यश टिकवणे शक्य होते.

१. 


त्याची सुरवात २३ सप्टेंबर २००८ मध्ये झाली.  औरंगाबाद पासून  १६०० कि मी अंतरावरील पं . बंगाल मधील सिंगूर येथील नॅनो कार चा प्रकल्प टाटांनी बंद करण्याचा निर्णय घेतला. टाटांच्या सोबत सुटे भाग पुरवठादार असलेल्या औरंगाबाद मधील कंपनींचीही गुंतवणूक सिंगूर येथे झालेली होती. आधीच मरगळलेल्या औरंगाबाद मधील वाहन उद्योगावर या घटनेने अजूनच वाईट परिणाम होणार हे स्पष्ट दिसत होत.

यानंतर कंपनी च्या मुख्यालयात बैठकी वर  बैठकीचा सपाटा  चालू झाला. अशाच एका बैठकी मध्ये साहेब आणि मी हजेरी लावून आलो. कंपनीच्या मुख्य अधिकाऱयांनी स्पष्ट शब्दात सांगितले आलेल्या संकटावर मात करायची आहे आणि त्यासाठी  सर्वच युनिट नि आपला उत्पादन खर्च नियंत्रित करणे आवश्यक आहे. ४० मिनिटे चाललेल्या या बैठकीमध्ये कंपनी पुढे असलेले आव्हान आणि आपण काय करायला हवे याचे स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले.

साहेब आणि मी कार ने परतत असतांना त्याच विषयी चर्चा झाली. "सचिन एक शॉप फ्लोअर  मीटिंग बोलाव मला सर्वच विभाग प्रमुख , कामगार (स्थायी आणि अस्थायी) उपस्थित असायला हवे.  यातून बाहेर पाडण्यासाठी सर्वाना यात सामील कारण आवश्यक आहे ". कंपनीच्या पार्किंग मध्ये कार मधून उतरत असताना साहेबानी मला सांगितले.

दुपारी दोन वाजता शॉप फ्लॉवर वर जाण्यापूर्वी त्यांनी मागितलेला अहवाल मी त्यांच्या हाती दिला. त्यावर एक नजर टाकून ते थोडेसे हसून म्हणाले "मस्त !!!  चल जाऊया आता सर्व जण आलेत ना?" 
"हो तर" इति मी.
  
मशिन शॉप च्या बाजूला असलेल्या मोठया जागे मध्ये सर्व जण जमलेले होते. खाली टाकलेल्या चटई वर व्यवस्थित रंगे मध्ये सर्व जण बसलेले होते, विभाग प्रमुख आणि शिफ्ट सुपरवायझर बाजूने उभे होते. आम्ही तिथे पोहचलो. साहेबानी एक नजर सर्वांवर टाकली आणि ध्वनिक्षेपक हातामध्ये घेतला. थोडास घसा  खाकरून त्यांनी बोलायला सुरवात केली. "मित्रानो आपण सर्व जण इथे एका महत्वाच्या विषयावर माहिती घेण्यासाठी जमलेलो  आहोत... " पुढचे काही मिनिटे त्यांनी सद्य परिस्थिती आणि कंपनी समोर असलेल्या आव्हानांविषयी सर्वाना अवगत केले... " या सर्व गोष्टीमुळे आपल्याला आपले सर्व खर्च उदाहरणार्थ वीज , कच्चा  माल, टूल, ऑइल कूलंट यांच्या अपव्यय नियंत्रित करायचा आहे यामुळे आपला  उत्पादन खर्च कमी होईल.  तसेच अनुत्पादक खर्च देखील कमी  करायचा आहे..." यासंदभात एका टीम चीही त्यांनी घोषणा केली.

 पुढच्या  तीन महिन्यात  थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीचा अनुभव आम्ही सर्व घेणार होतो... 

क्रमशः 
भाग १/५

© सचिन काळे 

सावध ऐका पुढल्या हाका #उद्योग ४.०



उत्पादन क्षेत्रामध्ये मोठे बदल घडत आहेत. उद्योग विश्वातील चौथी क्रांती ज्या वेगाने होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात उद्योग क्षेत्राची
घडीच बदलणार आहे.
उत्पादन प्रक्रियेमध्ये digitalization, connected shop floor च्या माध्यमातून होणाऱ्या कामामध्ये मानवी हस्तक्षेप कमीत कमी करण्याच्या दृष्टीने खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास आणि अमल बजावणी सुरू आहे. कामामध्ये येणाऱ्या अडचणी त्वरित संबंधितांकडे पोहचवणे यासाठीचे तंत्र विकसित करून अगदी तुमच्या हातामधील मोबाईल स्क्रीन वर सद्य परिस्थिती काय आहे, हे दिसणे ही एक फारच सामान्य बाब झाली आहे.
Industry 4.0
द्वारे सॉफ्टवेअर चा अधिकाधिक वापर आणि त्याद्वारे स्वतः ची अडचण स्वतः च ठीक करणारी मशीन आपल्या कारखान्यामध्ये असणे आता फार दूरची गोष्ट नाही...

उद्योग१.०
१८०० मध्ये वाफेच्या शक्तीच्या शोधा मुळे उद्योगा मध्ये पहिली क्रांती घडवून आणली. जे व्यवसाय कौटुंबिक अथवा मित्रांच्या सहकार्याने छोट्या प्रमाणात चालायचे त्यांचे रूपांतर कारखान्यामध्ये व्हायला लागले. पण वाफ निर्मितीसाठी लागणारे पाणी, कोळसा आणि एकंदरच अवघड व्यवस्था यामुळे मर्यादित उत्पादन ही एक अडचण होती. खुपमोठा पसारा असल्याने मशीन ही एकाच ठिकाणी असणे, उत्पादन प्रक्रिया सुटसुटीत आणि लवचिकता नसणे ह्या वाफेच्या वापराच्या मर्यादा होत्या.
पण यामुळेच खूप जणांना रोजगार मिळाला आणि शेती ऐवजी अजून एक क्षेत्र खुले झाले.

वाहन उद्योग आणि रोजगार.

वाहन उद्योग आणि रोजगार.
एक दुचाकी अथवा चार चाकी कारखाना सुरू होतो तेव्हा अनेक छोटे मोठे रोजगार निर्माण होतात.
औद्योगिक शहर उभे रहाते.
फार दूर जायला नको औरंगाबाद जवळील वाळूज हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. बजाज इथे सुरू झाल्यानंतर कारखान्यात कामा साठी तांत्रिक कौशल्य असलेले मनुष्यबळाची गरज निर्माण तर झालीच पण त्यासोबतच विविध सुटे भाग पुरवठादार त्यांच्याकडे लागणारे कौशल्य आधारित मनुष्यबळ त्यासोबतच सेवा पुरविणारी एक व्यवस्था उभी राहिली.
आज वाळूज आणि परिसरात मुख्यत्वे बजाज चे पुरवठादार म्हणून सुरू झालेल्या अनेक कंपनी ह्या इतरही जागतिक स्तरावरील दुचाकी आणि चारचाकी कंपन्यांसाठी पुरवठादार म्हणून कार्य करत आहेत.
यामागे गुणवत्ता, वेळेवर पुरवठा आणि उत्कृष्ट प्रोसेस द्वारे उत्पादन या सर्वांचा तो एकत्रित परिणाम आहे.
या कंपनी मध्ये बहुतेक ठिकाणी उत्कृष्ट ते साठी टी पी एम प्रणालीचा अवलंब केलेला आहे. सुरवातीला बजाज च्या पुढाकाराने सुरू झालेला उत्कृष्ट तेचा प्रवास त्याची मिळणारी फळे पाहून पुढे सुरू राहिलाच आणि त्यासाठीचे अनेक पारितोषिकेही त्यांनी मिळवली, उदा जपान इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट मेंटेनन्स द्वारा देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या एक्सलंस टी पी एम अवॉर्ड. (थोड विषयांतर होतंय याविषयी सविस्तर नंतर कधीतरी)
तर पुन्हा मूळ विषयाकडे,
साधारणतः एक पुरवठादार कंपनी सुरू होते तेव्हा त्यासाठीही पुन्हा छोटे छोटे व्यवसाय सुरू होतात. यामध्ये अगदी टूल सप्लायर, ग्रीस, बेल्ट, स्क्रॅप, मशीनचे सुटे भाग विक्रेते त्यासोबतच हंगामी कामगार पुरवणारे, केटरींग, शिंपी, मालाची वाहतूक करण्यासाठी चे वाहन पुरवठादार इत्यादी अनेक व्यवसाय सुरू होतात.
तसेच घरांची , शाळा, उद्यान इत्यादींची गरज निर्माण होऊन तो एक व्यवसाय सुरू होतो.
यासोबतच गॅरेज, पंक्चर, चहा, नाश्ता देणारे छोटे मोठे हॉटेल असा विविध प्रकारच्या व्यवसायांची निर्मिती होते.
एक उत्पादन साखळी अनेक उद्योगांना आणि रोजगार निर्मिती होनेसाठी अशा प्रकारे कारणीभूत ठरते.
त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही तुमच्या गाडीला चावी लावाल तेव्हा तुम्ही किती लोकांच्या रोजगार निर्मितीसाठी कारणीभूत झालेला आहात याचा विचार करा आणि स्वतः च स्वतः ची पाठ थोपटायला विसरू नका.

© Sachin Kale 8 Sept 2018